TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 जून 2021 – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने बँकांना चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा झटका दिलाय. सार्वजनिक बँकांचे कर्ज बूडवून तिन्ही उद्योगपतींनी परदेशात पलायन केलं आहे.

ईडीने या प्रकरणात नीरव मोदी, विजय माल्ल्या आणि मेहुल चौक्सी यांची सुमारे १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केलीय.

उद्योगपती विजय माल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत सुमारे १८ हजार १७० कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी सुमारे ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित केली आहे.

या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दलची माहिती ईडीने ट्वीट करून दिलीय. केवळ संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात १८,१७०.०२ कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ८०.४५ टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. यापैकी ९३७१.१७ कोटी रुपये मूल्यधारणा असलेली संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे, अशी माहिती ईडीने दिलीय.

काही बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बॅंकेत १३,५०० कोटींचा घोटाळा केला आहे. सध्या लंडनमधील एका तुरूंगात नीरव मोदी आहे. मेहुल चोक्सी डोमिनिकातील तुरूंगामध्ये आहे.

दोघांविरुद्धही सीबीआय चौकशी करत आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे ९००० कोटींचा घोटाळा आणि बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी विजय माल्ल्याची चौकशी सुरूय. यात किंगफिशर एअरलाईन्सचा देखील समावेश आहे.