TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 ऑगस्ट 2021 – कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांचे दरवाजे 17 ऑगस्टपासून पुन्हा उघडणार आहेत.

गेल्या दीड वर्षापासून ऑनलाइन वर्ग सुरू होते. पण, मुलांना शाळांकडे वळवण्यासाठी आता ‘चला मुलांनो, शाळेत चला’ ही मोहीम राबवण्याच्या सूचना सरकारने दिल्यात.

कोविड प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास परवानगी दिलीय. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर आणि एका वर्गामध्ये केवळ 15 ते 20 विद्यार्थी बसवण्याची सूचना जारी केलीय.

महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या समितीमध्ये वॉर्ड ऑफिसर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व शिक्षण अधिकारी सदस्य असणार आहेत.

  • # विद्यार्थी संख्या अधिक असलेल्या शाळा दोन सत्रांत होतील. एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असतील. दोन बाकांध्ये सहा फूट अंतर ठेवावेचे आहे.
  • # विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नाही. पूर्णपणे पालकांच्या संमतीवर उपस्थिती अवलंबून असणार आहे.
  • # शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो शाळेच्याच शहर किंवा गावामध्ये करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
  • # देशातील सहा ते नऊ वयोगटातील 57. 2 टक्के विद्यार्थ्यांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्यात.