TOD Marathi

नवी दिल्ली | भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सेहवागला मुख्य निवडकर्ता पदाची ऑफर देण्यात अली होती या संबंधित सर्व बातम्या त्याने फेटाळून लावल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सेहवागने सांगितले की, या संदर्भात बीसीसीआयने कधीही संपर्क केला नाही. स्टिंग ऑपरेशनच्या घटनेनंतर भारतीय क्रिकेटच्या मुख्य निवडकर्त्याचे पद रिक्त आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये चेतन शर्माला भारतीय खेळाडू आणि संघ निवडीशी संबंधित अनेक गुपिते उघड करणाऱ्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडल्याने त्याला आपले पद गमवावे लागले होते. तेव्हापासून, माजी भारतीय सलामीवीर शिव सुंदर दास अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. निवडकर्त्यांच्या पॅनेलमध्ये एस शरथ, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला या सदस्यांचा समावेश आहे.

हेही वाचा “…राज्यात दूध भेसळखोरांवर लागणार ‘मकोका’? दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती” 

बीसीसीआयला आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी आपला मुख्य निवडकर्ता निवडायचा आहे, ज्यासाठी भरती प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. निवड समितीचा अध्यक्ष उत्तर विभागातून येणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. युवराज सिंग, गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांसारखी मोठी नावे आहेत, ज्यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे, परंतु अटींनुसार तिघेही पाच वर्षांच्या निवृत्ती कालावधीचे निकष पूर्ण करू शकलेले नाहीत. अशा स्थितीत वीरेंद्र सेहवागही पाच वर्षांच्या निवृत्तीच्या ब्रॅकेटमध्ये बसतो, पण एवढ्या कमी पगारावर तो ही जबाबदारी घ्यायला तयार नाही.