TOD Marathi

मुंबई :

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला होता (Sanjay Raut took a bold stance and targeted the ruling Shinde and Fadnavis). त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राऊतांना बाहेरचं वातावरण मानवत नाही का म्हणत इशारा दिला होता अशी उघड धमकीच दिली. त्यावर आता संजय राऊतांनीही देसाईंना ललकारलं आहे. कायदा-न्यायालये-तपास यंत्रणा तुमच्या खिशात आहेत असंच जर शंभूराज देसाईंना म्हणायचं असेल तर मी तयार आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी आपले इरादे स्पष्ट करुन पुन्हा एकदा संघर्षाला तयार असल्याचंच सांगितलं आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक आरोप करत आहेत. त्यांनी आपले तोंड आवरावे. तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहात. बाहेरचं वातावरण तुम्हाला सूट होत नाही, असे तुमच्या बडबडण्यावरून वाटत आहे. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी अशी वक्तव्ये करणे टाळा, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला होता. देसाई यांच्या धमकीवर राऊतांनीही आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री महोदय, ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ आहे. सरकार शिवरायांचा अपमान सहन करत आहे. सीमावादावर कर्नाटक महाराष्ट्राला आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा-न्यायालये-तपासयंत्रणा आमच्या खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांना म्हणायचे आहे का? जर त्यांना तसे म्हणायचे असेल तर मी तयार आहे, असं खुलं आव्हानाच संजय राऊतांनी दिलं आहे.

सीमाप्रश्न कोणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. सीमाप्रश्नी सर्वपक्षीय भूमिका घेणे गरजेचे आहे. याआधी याप्रश्नी एक समिती स्थापन झाली होती. त्या समितीत एस एम जोशी, बाळासाहेब ठाकरे, नानासाहेब गोरे, शरद पवार, एन डी पाटील अशा सगळ्याच पक्षाचे लोक होते. त्यामुळे सीमावादाचा प्रश्न हा राजकीय अभिनिवेशाचा प्रश्न होऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं आणि आजघडीला शरद पवारांपेक्षा दुसरा वरिष्ठ नेता नाही. शरद पवारांनी याआधी बेळगावात जाऊन आंदोलने केली आहेत. त्यामुळे पवारांच्या सीमाप्रश्नाच्या भूमिकेमागे महाराष्ट्र उभा राहिल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.