TOD Marathi

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीवरुन ( Andheri East Election ) राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपकडून मुरजी पटेल ( BJP Candidate Murji Patel ) तर उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके ( Rutuja Ramesh Latake )  या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेतील ( Shivsena ) बंडाळीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं आगामी पार पडणाऱ्या महानगरपालिकेसाठीची ही लिटमस टेस्ट ठरणार आहे. त्यामुळे आता यात नक्की कोण बाजी मारणार याची धाकधूक दोन्ही गटांना लागून राहिली आहे.

अशातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS Leader Raj Thackeray ) यांनी एक लेटर बॉम्ब टाकत फडणवीसांना ( Devendra Fadanvis ) पत्र लिहीलं आणि पोटनिवडणूकीतून भाजपनं माघार घ्यावी अशी मागणीही केली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अंधेरीच्या पोटनिवडणूकीबाबत त्यांनी आपल्या पक्षाची अधिकृत भूमिकाही स्पष्ट केली आहे.

पवार याप्रकरणी बोलताना म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकी झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेंव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

रमेश लटके यांचा योगदान पाहता. ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील, आणि एक चांगला संदेश जाईल. महाराष्ट्रत योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.