![](https://todmarathi.com/wp-content/uploads/2021/07/Shivneri-bus-pandhari-wari-2021.jpg)
टिओडी मराठी, दि. 19 जुलै 2021 – कोरोनामुळे यंदा पंढरीच्या वारीवर देखील निर्बंध आलेत. आज संत ज्ञानेश्वर महाराज पादुका पंढरपूरला रवाना झाल्यात. आज शांतता पाहायला मिळत असली तरी ती इंद्रायणी अजून वारकऱ्यांची वाट पाहत आहे, असं वाटतंय. कारण यंदा इंद्रायणीचा काठ ओस पडला आहे.
गेल्या वर्षीची खंत यंदा भरून निघेल, असे वाटत होतं. देहू व आळंदी वारकऱ्यांनी फुलून जाईल असं वाटलं होतं. मात्र, पदरी निराशा पडली आहे. असं जरी असलं तरी ज्या वेळी समाजावरती संकट ओढावलं, त्या वेळी वारकरी सांप्रदायाने दिशा दाखवली. सहिष्णू म्हणजेच संयमाचा मार्ग पत्करला आहे.
त्याप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेण्याबरोबरचं आरोग्याची पताकाही खांद्यावर घेतली. एसटीतून वारी करण्याचा निर्णय घेतलाय.
त्यामुळे वारकऱ्यांनी वारकरी धर्माची परंपरा खंडीत होऊ न देता मोठ्या मनाने यंदाचा सोहळा करण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे मनात खंत असली तरी मानाचे वारकरी मात्र उत्साहात प्रस्थान सोहळा पार पाडतील.