TOD Marathi

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जयंत पाटील यांनी आज पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने केलं आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे, हे विचार करण्यासारखं आहे. पण आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लखीमपूरच्या दुर्घटनेला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. भारतातला सर्व शेतकरी आता पेटून उठला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं धाडसत्र करुन लक्ष वळवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.