TOD Marathi

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला. तर राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. एकूण नऊ महत्त्वाच्या निर्णयांना कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली.

हेही वाचा ” …अमोल कोल्हेंच्या मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा? आमदार सचिन अहिर म्हणाले…”

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

१. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव
२. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा
३. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार
४. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी
५. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
६. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला
७. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे
८. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
९. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय