TOD Marathi

तीन राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर इंडिया आघाडीची तातडीनं बैठक होतीये. उद्धव ठाकरे या बैठकीला जाणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. पण तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विजयावरून मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
शिवसेना किती फोडा, प्रशासनातून बाहेर काढा. शिवसेना संपलेली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यासोबतच त्यांनी मोदी सरकारला थेट आव्हानही दिलं आहे.
पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आता मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या. तुमची एवढी लाट आहे तर एकच लोकसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. दम असेल तर मतदारांची शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
दरम्यान, साधी सिनेटची निवडणूक लांबवता तिथे वेळ जात नाही का. मग लोकसभेची मतमोजणी करण्यासाठी वेळ गेला तर बिघडलं कुठे. मुंबई महापालिकेची निवडणूकही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी मोदी सरकारला दिलं आहे.