TOD Marathi

सिंधदुर्ग: भाजपला सत्तेची घाई झाली असल्याने ते शक्य त्या मार्गाने दबाव ताकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधात सगळ्या मार्गाचं अवलंब करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

छगन भुजबळ यांच्या प्रमाणेच अनिल देशमुख सुद्धा निर्दोष सुटतील, असा दावा पाटील यांनी केला आहे. काहीही केलेलं नसताना मंत्र्यांना तसेच नेत्यांना त्रास देणे, त्यांचा मानसिक छळ करणे, हे सर्व भाजप सध्या करत असून राज्यातील सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान करण्यात येत आहे.

समीर वानखेडे यांच्या बद्दल बोलताना पाटील म्हणाले की, मराठी किंवा अमराठी असा काही मुद्दा नसतो. भुजबळ यांनी २८ महीने तुरुंगात घातले मात्र अखेर ते निर्दोष मुक्त होऊन बाहेर आले, ते देखील मराठी होते. त्यामुळे सर्वांना नियम सारखेच असतात, असंही ते म्हणाले.