TOD Marathi

मुंबई: समीर वानखेडे प्रकरणावरून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. आता त्यांनी थेट विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. लवकरच सगळ्यांचं पितळ उघडं करणार तेव्हा भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी मी माध्यमांमध्ये विविध विषयांवर बोलत होतो, म्हणून मला कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाने जी जागा कुर्ल्यात खरेदी केली होती त्यावेळी जाणीवपूर्वक त्यावर आरक्षण टाकलं. आम्हाला ती डेव्हलप करता येत नाही. त्यांना एवढंचं सांगणं आहे की, किती आरोप तुम्हाला करायचे असेल तर करा. आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाहीत.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार नवाब मलिक यांनी घेतला. दिवाळीनंतर आणखी गोप्यस्फोट करणार असल्याचं सोमय्या म्हणले आहेत, यावर मलिक म्हणाले, भाजपचा भांडाफोड मी करणार आहे. त्यानंतर मात्र भाजपवाले राज्यात कुठेही तोंड दाखवू शकणार नाहीत. पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही.