TOD Marathi

नांदेड :

भारत जोडो यात्रेच्या वेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. (News of controvesy between Ashok Chavan and Amit Deshmukh) त्यावर आता स्वतः अशोक चव्हाण यांनी खुलासा केला आहे. माझ्यात आणि अमित देशमुख यांच्यात काही वाद असल्याच्या बातम्या या निराधार आणि कपोलकल्पित आहेत असं ते म्हणाले. याविषयी अमित देशमुख यांनी या आधीच त्यांची भूमिका फेसबुकवर मांडली होती. ती मांडलेली भूमिका हीच वस्तुस्थिती असून, त्यांच्याशी पूर्णतः सहमत असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. (Ashok Chavan clarified the issue)

भारत जोडो यात्रा चांगल्या प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी झाली असून नांदेड आणि लातूरमध्ये निर्माण झालेले मतभेदाचे वृत्त निराधार आणि तथ्यहीन आहे असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

त्या आधी काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते की, (Amit Deshmukh writes on social media over the issue of controvery) काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा अभूतपूर्व प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी ठरलेली आहे. असे असताना काही प्रसार माध्यमातून या निमित्ताने नांदेड-लातूर जिल्ह्यात मतभेद उघड झाल्यासंबंधीचे प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन आणि निराधार आहे. भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात नांदेड (Bharat Jodo Yatra in Maharashtra) जिल्ह्यातील देगलूर येथे आली असता तेथील स्वागताची जबाबदारी माझ्यावर तर नांदेडला लगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यात्रेचे स्वागत करण्याची जबाबदारी लातूर जिल्ह्यावर होती. त्यामुळे नांदेडच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. वास्तविक पाहता चव्हाण-देशमुख कुटुंबीयांचे संबंध हे अनेक दशकांपासूनचे आहेत. या दोन्ही कुटुंबामध्ये ओलावा जिव्हाळा प्रेम आणि सन्मान होता आहे आणि पुढेही तो कायम राहणार आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी अमित देशमुख यांचे ट्वीट रिट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे.