TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2021 – येत्या तीन महिन्यात देशातील सर्व टोलनाके पूर्णपणे बंद करण्यात येतील. आता प्रत्येक वाहनामध्ये जीपीएसप्रणाली बसविण्यात येणार आहे. त्या आधारे टोलची वसुली केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे.

याबाबत नितीन गडकरी म्हणाले, याअगोदरच्या काँग्रेस सरकारने अनेक ठिकाणी अन्याय पद्धतीने टोलनाके बसविले होते. ज्यामुळे चोरी अधिक प्रमाणात होत आहे.

आम्ही येत्या तीन महिन्यात सर्व टोलनाके बंद करणार आहे. तसेच टोलवसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापरणार आहोत. आम्ही प्रत्येक वाहनात जीपीएस ट्रॅकर प्रणाली बसविणार आहे. ज्यामुळे जेवढा प्रवास केला जाईल, तेवढाच टोल आकारला जाईल.

याअगोदर डिसेंबर महिन्यात या योजनेची माहिती नितीन गडकरी यांनी दिली होती. या माहितीला दुजोरा देत आता येत्या तीन महिन्यात भारत टोलमुक्त होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

योजना अमलात आल्यानंतर दोन वर्षात भारत पूर्णपणे टोलमुक्त होणार आहे. देशातील सर्व वाहने ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज असणार आहेत. सर्व जुन्या वाहनांत जीपीएस सिस्टिम तंत्रज्ञान बसवण्यासाठी सरकार वेगाने काम करणार आहे. जसे फास्ट टॅग अनिवार्य केलं तसेच ही जीपीएस सिस्टिम प्रत्येक कारसाठी अनिवार्य करणार आहे, असेही त्यांनी सांगितलं आहे.

अशी आहे यंत्रणा –
# जीपीएस प्रणालीनुसार जेवढा प्रवास केला जाईल, तेवढाच टोल वसूल करणार.
# हा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून थेट वजा होणार.
# टोलसाठी जीपीएस प्रणालीचे काम सुरु असून लवकरच ही जीपीएस सिस्टिम बाजारात येणार.
# रशियन सरकारच्या मदतीने जीपीएस सिस्टिमवर काम सुरू.