TOD Marathi

अवघ्या काही तासानंतर देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा (Draupadi Murmu and Yashwant Sinha) यामधून कोण राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकेल ते आज कळणार आहे. भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी देखील सुरू झाली आहे. (Presidenial election vote counting) सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी समाप्त होणार आहे. आणि नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैला होणार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक मानले जातात. मात्र, जे राष्ट्रपती पंतप्रधानांना किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाला शपथ देतात त्यांना शपथ कोण देतं?राष्ट्रपती त्यांचा राजीनामा कोणाकडे सोपवतात? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो, आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.

भारतीय राज्यघटनेत (Indian Constitution) राष्ट्रपतींची पात्रता, त्यांच्या जबाबदाऱ्या, शपथविधी, राजीनामा, महाभियोग यासंदर्भात विस्तृत माहिती दिलेली आहे. राष्ट्रपतींच्या शपथविधी संदर्भात माहिती घटनेच्या कलम 60 मध्ये मिळते. भारताचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराला पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. अपवादात्मक परिस्थितीत सरन्यायाधीश पदावर नसतील तर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती शपथ देण्याचं काम करतात. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. (President gives resignation to Vice President) त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यायचा असल्यास तो उपराष्ट्रपती यांना द्यावा लागतो. राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांच्या परवानगीने त्यांचा कारभार पाहतात. राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पुढे उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती राष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. नव्या राष्ट्रपतींची निवड त्यांचं पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यात करणे आवश्यक असतं.

भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपतींची शपथ नेमकी कोणत्या दिवशी घेतली जाते, या संदर्भात माहिती नाही. मात्र नीलम संजीव रेड्डी हे 1977 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले होते आणि त्यांनी 25 जुलै 1977 रोजी शपथ घेतली होती. (Sanjeev Reddy was elected as President of India unopposed in 1977) तेव्हापासून ही परंपरा जोपासली जाते. राष्ट्रपती पदावर असताना त्यांचं निधन झाल्यास त्यांच्या पदाची सूत्र उपराष्ट्रपतींकडे जातात. मात्र अशा वेळी सरन्यायाधीशांकडून उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली जाते तर उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी ही सरन्यायाधीशांकडे असते.