TOD Marathi

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 9 ऑगस्ट 2021 – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्यासह काही विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे अमित शहा यांचा हात आहे, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. या हल्ल्यामुळे घाबरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केलाय.

त्यांनी हे वक्तव्य कोलकात्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असलेल्या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर केले. अभिषेक आणि अन्य नेत्यांवर भाजपशासित त्रिपुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी हा आरोप केलाय. त्रिपुरामध्ये २०२३ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तत्पूर्वी या राज्यामध्ये तृणमूल काँग्रेसने पाय रोवण्यास सुरुवात केलीय.

त्रिपुरा, आसाम, उत्तर प्रदेश व जिथे त्यांचे सरकार आहे. तिथे भाजप अराजकता पसरवत आहे. आम्ही अभिषेक व अन्य पार्टी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्याशिवाय असे हल्ले होणे शक्य नाही.

त्रिपुरा पोलिसांच्या समोर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा हात असल्यामुळे पोलीस मूग गिळून गप्प बसलेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असे हल्ले करण्याचा दम नाही, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

पक्षाच्या कामानिमित्त त्रिपुरात टीएमसीचे युवा नेते देबांग्शु भट्टाचार्य, सुदीप राहा व जया दत्ता गेले होते. पण, रस्त्यामध्ये त्यांच्या वाहने अडवून हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलाय. अगरतलानंतर धर्मनगर इथे गोळ्या चालवल्या गेल्या.

एक टीएमसीचे कार्यालय हि फोडल्याचा आरोप त्यांनी केला. तर मागच्या काही दिवसामध्ये अभिषेक बॅनर्जी यांना काळे झेंडे दाखवले होते. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांवर दांड्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.