TOD Marathi

मुंबई:
उद्या दुपारी 1 वा. शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामध्ये माझ्यासह कोल्हापूरचे संजय पवार हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील नेते उपस्थित राहणार आहेत. असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीबद्दल स्पष्ट वक्तव्य केलय.

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर आमच्यासाठी सहाव्या जागेचा विषय संपला असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. आमच्याकडे मतांचा कोटा हा आवश्यक मतांपेक्षा अधिक आहे असेही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. आता छत्रपतींचे काय होणार असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की या विषयावर माझ्याकडे नवीन माहिती नाही.

आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.