TOD Marathi

‘त्या’ केवळ अफवा आहेत !; Airport Headquarters अहमदाबादला नेण्याच्या चर्चेवर Adani Group चा खुलासा

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 20 जुलै 2021 – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे, असे वृत्त समोर आल्याने राजकीय वातावरण तापलं. मात्र, आता अदानी समूहाने याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. मुख्यालय हलवण्याबद्दलचा कोणताही निर्णय झालेला नाही, असा खुलासा करत अशा चर्चा निव्वळ अफवा आहेत, असं या अदानी समूहानं म्हटलंय.

‘मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला नेणार आहे, अशा चर्चा केवळ अफवा आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची मुख्यालयं मुंबईत राहतील.

मुंबईच्या अभिमानात भर घालत राहू, हा आमचा शब्द आहे. आमच्या विमानतळांच्या साखळीतून आम्ही रोजगारांच्या हजारो संधी तयार करू, असे अदानी समूहानं एका ट्विटमध्ये म्हटलंय.

अदानी समूहाने विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे, अशा वृत्तानं राजकीय वातावरण तापलं होतं. तुम्ही गरबा कराल, तर आम्हाला झिंगाट दाखवावा लागला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अदानी समूहाला इशारा दिला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून थेट नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, असं म्हटलं. तसेच अदानींविरुद्ध राज्यभर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला. गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, मुंबईतील इंस्टीट्यूट गुजरातला नेलं जात आहेत. पण, महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अशा शब्दांत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी सरकारला इशारा दिला.