TOD Marathi

सांगली: भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्याने संतप्त क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडल्याचा प्रकार घडला आहे. अत्यंत रोमांचक सामना काल पाहायला मिळाला मात्र अखेर भारताच्या पदरी पराभव आला. कट्टर विरोधी संघ असलेल्या पाकिस्तानकडून हारल्याने क्रिकेट प्रेमींना संताप अनावर झाला आणि टीव्ही फोडण्याची परंपरा कायम ठेवली. मॅच हरल्यानंतर प्रक्षेकांनी रस्त्यावर टीव्ही आणून फोडून टाकला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील पाटील गल्लीत हा प्रकार घडला आहे. त्याची चर्चा सर्वत्र जोरात सुरु आहे.

टी20 विश्वचषकातील सर्वात बहुप्रतिक्षित सामना असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची अखेर सांगता झाली. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सुरुवातच अतिशय खराब झाली आहे.

खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली. अखेर भारताचा पराभव झाला.