TOD Marathi

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात ही क्रूर वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का, असा प्रश्नही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. लखीमपूर खेरी इथे घडलेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे.

घटनस्थळी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास बंदी घालण्यात आल्यावरुनही राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय, विरोधी पक्षाला तिथे जायला बंदी घातली आहे, ही कोणती लोकशाही आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.