TOD Marathi

देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा मुंबई दौरा नुकताच आटोपला. मुंबईत अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं (Lalbaug Raja Ganpati) दर्शन घेतलं. तसेच, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अशा काही प्रमुख नेत्यांच्या घरच्या बाप्पाच्या (Ganesh Darshan) दर्शनासाठीही त्यांनी उपस्थिती लावली. अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा देखील यानिमित्ताने झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याचं राजकीय महत्व काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. या दौऱ्यामागची नेमकी गणितं काय आहेत ते जाणून घेऊयात…
पुढच्या चारच महिन्यात मुंबई महापालिकांचं बिगुल वाजणार आहे. शिसेना-भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यातलं ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता भाजपनं मुंबई पालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबई पालिकेचं एका वर्षाचं बजेट हे 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेली 25 वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आहे. शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची सत्ता ही मोठी ताकद मानली जाते.
उद्धव ठाकरेंकडून ( Uddhav Thackeray)  राज्याची सत्ता गेलेली आहे. थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde)  नेतृत्व स्वीकारलय आंनी अशा परिस्थितीत आता जर मुंबई महापालिका गेली तर शिवसेनेची मोठी कोंडी होईल. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation)  मागील निवडणुकीत आशिष शेलारांच्या नेतृत्वात भाजपनं 31 वरुन थेट 82 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत उत्तर भारतीय मतं, गुजराती मतं आणि मनसेच्या जवळीकीमुळे मराठी मतांची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबई भाजपच्या बैठकीत अमित शाह यांनी १५० जागा जिंकायच्या आहेत असं म्हणत सत्ता आपलीच असली पाहिजे असा संदेशच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.
40 लाख एवढे उत्तर भारतीय मतदार सध्या मुंबईत ( Mumbai) आहेत, तेही मुख्यत: बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. महापालिकेच्या 227 पैकी 40 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय प्रभावशाली आहेत, तिथं उत्तर भारतीय मतदार नगरसेवक ठरवतात अशी परिस्थिती आहे. त्याशिवाय 50 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचा मोठा समुदाय आहे. त्यामुळे त्यांना डावलणं अशक्य आहे. भाजपनं (BJP) विविध प्रांत, जिल्हा आणि समुदायाच्या माहितीसह मुंबईतील मतदारांच्या अभ्यास याद्या तयार केल्याची माहिती आहे. मुंबईत गुजराती मतांची संख्यादेखील जवळपास 15 लाखांच्या घरात आहे, त्यात गेल्या 5 वर्षात आणखी भरपडली आहे. साधारण 40 वॉर्डांमध्ये गुजराती मतं निर्णायक ठरतात. आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय विजय अशक्य आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठीही भाजपची व्यूहरचना निश्चितच असणार आहे. हिंदू सणांवरचेही निर्बंध हटवून नवे कार्यक्रम भाजपनं आखलेत.
एकंदरीत अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात गणपती बाप्पांच्या दर्शनासह मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता आलीच पाहिजे. असा कानमंत्र भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. सर्व प्रकारचे मतदार हे आपल्या बाजूने असले पाहिजेत असे प्रयत्न करा हेही अर्थातच अमित शाह यांनी सांगितले असेलच