TOD Marathi

औरंगाबाद : महाविकास आघाडीला पुन्हा एकदा नवा धक्का बसलाय. आघाडी सरकारने नेमलेले विश्वस्त मंडळ (Sai Mandir Trust) बरखास्त केल्याने हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. शिर्डी (Shirdi) साई मंदिराचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टानं आज आपला निकाल दिला आहे.

दरम्यान साईसंस्थानच्या घटनेनुसार नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप शेळके यांनी याचिकेत घेतला होता. पुढील आठ आठवड्यात नविन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही खंडपीठानं यावेळेस दिले आहेत. त्यामुळे या निर्णयानंतर आता महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच हमरीतुमरी पाहायला मिळणार आहे.