TOD Marathi

Kabul मध्ये अडकलेल्या 255 भारतीयांना आणले मायदेशी सुखरुप

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. भारतीय वायुदलाच्या आणि एअर इंडियाच्या विमानाच्या माध्यमातून आज सकाळी सुमारे अडीचशे भारतीय नागरिकांना मायदेशी आणले.

आज सकाळी 168 भारतीय वायुदलाच्या C-17 विमानाने वायुदलाच्या हिंडन बेसवर दाखल झाले होते. तर त्याअगोदर 87 भारतीयांना एअर इंडियाने नवी दिल्लीत सुखरुप आणले आहे.

काल 150 भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर भारतीयांची अफगाणिस्तानमधून सुटका करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग आला आहे. अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या कामात ताजिकिस्तानमधील भारतीय दूतावास महत्वाची भूमिका बजावत आहेत.

एअर इंडियाच्या विमानामध्ये भारतीय नागरिक सुखरुपपणे बसताच ‘भारत माता की जय’ असा एकच जयघोष सुरु झाला. दीडशे भारतीयांना अफगाणिस्तानात काबुल विमानतळावर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वृत्त शनिवारी आले होते.

त्यानंतर या दीडशे भारतीयांना ताबिलान्यांनी सोडून दिले. सर्व भारतीय हे सुरक्षित असून त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडून दिले होते.

तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी आम्ही भारतीयांचे अपहरण केलेलं नाही. त्यांना सुरक्षितस्थळी नेल्याचा दावा केला होता. तसेच अपहरण केल्याचे वृत्त तालिबान्यांनी फेटाळले होते. हे वृत्त निराधार आहे, तालिबान अशी कृती कधीच करणार नाही, असा दावा तालिबानी प्रवक्ता अहमद्दुल्ला वसीक यांनी केला होता.