TOD Marathi

मुंबई: नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले? कुठून पैसे आले? कसे आले? ते कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडलाय, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावं, असे यावेळी सोमय्या म्हणाले. १९ दिवसांपासून ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. यापासून लक्ष विचलीत व्हावं म्हणून नवाब मलिक यांना पुढे केलं जात आहे, असंही ते म्हणाले.

नवाब मलिकांची एवढी कपॅसिटी नाही, हे घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे. ज्यावेळी समीर वानखेडे यांना नोकरी लागली तेव्हा तुम्ही काय करत होतात? असा सवाल सोमय्या यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला.