TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 जून 2021 – महाराष्ट्र राज्यातील वाढत्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सावध पावले टाकत आहे. कारण कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा विषाणू याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल.

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं व जिल्ह्यांमधील निर्बंधांत वाढ केली आहे. राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले. मात्र, निर्बंधांत शिथिलता आल्यानंतर काही दिवसात कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांत काही प्रमाणात वाढ झाली.

सोबत राज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका ही वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्या नियमावलीत नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केलाय.

पुण्यात हे सुरु, हे बंद :
पुण्यात अगोदर नियमावलीत बदल केला आहे. आजपासून पुणेकरांना नवे नियमांचे पालन करावे लागणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व गरजेच्या सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवसात चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहणार आहेत. पुण्यामध्ये सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.

  • सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहणार. तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहणार.
    मॉल्स, सिनेमागृहं पूर्ण बंद राहणार.रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने व शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत सुरु असणार.उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील.खाजगी कार्यालये कामाच्या दिवशी ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत.

    अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने असणार.

    लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोरोनासंबंधी सर्व नियम पाळणं गरजेचं.

    अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना केवळ 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी.

    पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी दिली आहे.

    कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.