TOD Marathi

मुंबई : स्वतःच्या पक्षाचे, मित्रपक्षांचे आणि त्यांना समर्थन देणारे आमदार बिकाऊ आहेत असे उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते म्हणत आहेत. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप हे फक्त गाढवच करु शकतो, अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेला टोला लगावला आहे.

सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, भाजपा या घोडेबाजारचे कधीच समर्थन करणार नाही. याविरुद्ध चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. पण हे जर खोटे असेल तर ते बोलणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,

दरम्यान निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो करणारा, पाहणारा आणि होऊ देणारा हे सर्व जबाबदार आहेत. म्हणून आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या प्रवक्त्यांचा ताबडतोब जबाब नोंदवण्यात यावा. घोडेबाजार करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी, असेही सोमय्या यावेळेस म्हणाले.