TOD Marathi

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत आपल्या हटके भूमिकेसाठी नेहमीच चर्चेत असते. कंगनाचा बहुचर्चित धाकड सिनेमा नुकताच बिग स्क्रीनवर आला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असे एकीकडे बोलले जात असताना आता कंगनाचा हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे.

धक्कादायक म्हणजे सिनेमाच्या आठव्या दिवशी अवघ्या 20 तिकिटांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने आता सोशल मीडियावरही धाकडला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

कंगनाच्या धाकडला कार्तिक आर्यनच्या भुलभुलैया टू या चित्रपटाने तगडी टक्कर दिली. त्यामुळेच कंगनाचा चित्रपट जास्त स्क्रीन मिळू शकला नाही. इतकेच नव्हे तर मागील काही वर्षांपासून कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहिली. बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या नेपोटिझमवरही कंगना वारंवार टीका करत आली आहे.