TOD Marathi

वाराणसी : बहुचर्चित ज्ञानव्यपी प्रकरणाचा मोठा निर्णय कोर्टाने दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी घेण्यास कोर्टाने होकार दिला आहे. वाराणसी कोर्टात 22 सप्टेंबरला ज्ञानव्यापी प्रकरणाची आगामी सुनावणी पार पडेल.

वाराणसी (Varanasi) जिल्हा न्यायालयानं हिंदू पक्षकाराच्या बाजून निकाल देताना म्हटलं की, राखी सिंह विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य केस न्यायालयात चालविण्यायोग्य आहे. असा निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मशीद कमिटीचा अर्ज कोर्टानं फेटाळला आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला.

यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी, रेखा आर्या आणि मंजू व्यास या 5 पैकी 3 फिर्यादी देखील कोर्टात पोहोचल्या होत्या. केवळ 40 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना कोर्टामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता.