TOD Marathi

टिओडी मराठी, चंदीगड, 29 ऑगस्ट 2021 – हरियाणामधील कर्नाल येथे शेतकऱ्यांवर जो अमानुष हल्ला केला आहे तो हल्ला हरियाणा सरकार पुरस्कृत हल्ला होंता, असा आरोप कॅ. अमरिंदरसिंग यांनी केलाय. त्यांनी म्हटले आहे की, हा अमानुष व निर्दयी प्रकार धक्कादायक आहे.

शेतकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्यात दहा शेतकरी जखमी झालेत. कर्नाल येथे होणाऱ्या भाजपच्या सभेच्या ठिकाणी निदर्शने करण्यासाठी शेतकऱ्यांचा एक जथ्थ्या तिकडे निघाला होता, त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला केला.

तथापि शेतकऱ्यांनी महामार्ग अडवल्याने त्यांच्यावर फक्त सौम्य लाठी हल्ला केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हरियाणातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून अशा प्रकारची अमानुष वागणूक मिळण्याचा हा पहिला प्रकार नव्हता. हे सरकार सातत्याने असे अमानुष हल्ले शेतकऱ्यांवर करीत आले आहेत, असे कॅ. अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.