TOD Marathi

देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली. (15th President Of India Draupadi Murmu)

यावेळी त्या पहिलं अभिभाषण करताना भावूक झाल्या. भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो व पूर्णही करु शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. (Droupadi Murmu Sworn in as President of India)

सकाळी साडे नऊच्या सुमारास द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर सव्वा दहाच्या सुमारास देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (CJI N V Ramanna) यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रि परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या की, ‘स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृत कालामध्ये वेगाने काम करावे लागेल. या 25 वर्षांत अमृतकाल प्राप्तीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल, प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये (Central Hall of Parliament) द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितले की, मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे, जिचा जन्म स्वतंत्र भारतात झाला. स्वतंत्र भारतातील नागरिकांसह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न वाढवायचे आहेत. माझा जन्म ओडिशातील आदिवासी गावात झाला. पण देशाच्या लोकशाहीनेच मला इथपर्यंत पोहोचवले.

‘२६ जुलै हा कारगिल विजय दिवसही आहे (Kargil Vijay Divas). हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देते.

द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशा महत्त्वाच्या काळात मला देशाने राष्ट्रपती म्हणून निवडले आहे. आजपासून काही दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरे करत असताना माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आणि आज स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात मला ही नवी जबाबदारी मिळाली आहे, हा देखील योगायोग आहे.

ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावातून मी माझा जीवन प्रवास सुरू केला. मी ज्या पार्श्‍वभूमीतून आले आहे, सुरुवातीचे शिक्षण घेणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. पण अनेक अडथळे येऊनही माझा निश्चय पक्का राहिला आणि मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी ठरले. गरीब घरात जन्मलेली मुलगी, दुर्गम आदिवासी भागात जन्मलेली मुलगी भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते हे आपल्या लोकशाहीचे सामर्थ्य आहे. माझी निवड म्हणजे भारतातील गरीब लोक स्वप्न पाहू शकतात आणि ते प्रत्यक्षात आणू शकतात याचा पुरावा आहे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

द्रौपदी मुर्मू या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. आज अनेक संकटांचा सामना करत त्यांनी राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याने त्या पूर्णपणे कोलमडल्या होत्या. पण त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने उभं राहून आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निवडला. ओडिशा राज्यात जन्मलेल्या मुर्मू यांच्या आयुष्यात आलेल्या वादळांबाबत अनेकांना माहिती नाही. या एका सर्वसाधारण महिलेचा राजकारणातील प्रवासही उल्लेखनीय आहे.