TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जुलै 2021 – अखेर आजपासून राज्यातील कोरोनामुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा सुरु होणार आहेत. मात्र, यासाठी सरकारने शाळा सुरु करताना नियमावली आखून दिलीय. त्या नियमांचे पालन करणे शाळांना बंधनकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, चंदीगड, आंध्रप्रदेश या राज्यांत शाळा सुरु केल्या आहेत.आता कॉलेजही सुरु होणार आहे. कारण, याबाबत प्रशासन विचार करत आहे.

यात ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना गाव पातळीवर दिल्या आहेत. तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन नियोजन करावे, असे आदेश शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. शाळा सुरु करताना टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिल्यात.

शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ विद्यार्थांना मिळावा, यासाठी कोरोनामुक्त भागात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोरोनामुक्त भागातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोरोना निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यामध्ये शाळेतील इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली.

मात्र, पालकांशी चर्चा करुन ठराव करावा लागेल. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्यात. आजपासून राज्यातील अशा कोरोनमुक्त भागात या सर्व नियमांचे पालन करत आठवी ते बारावीच्या शाळा सुरु केल्या आहेत.

आठवी ते बारावीचे वर्ग ज्या गावात सुरु करायला हवेत. त्या गावात किमान महिनाभर अगोदर एकही कोरोनाबाधित रुग्ण नसावा. याशिवाय, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना दिल्या आहेत. सोबत, शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करायला हवे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगितले आहे.

शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घ्यावेत, अशा सूचना दिल्यात.

एका बाकावर एकच विद्यार्थी आणि दोन बाकांमध्ये 6 फुटाचे अंतर, एका वर्गात अधिकाधिक 15 ते 20 विद्यार्थी बसवावेत. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करणे, असे मार्गदर्शक सूचना देखील दिल्या आहेत.

या दरम्यान, आजपासून देशभरातील इतर राज्यातही शाळा सुरु केल्या आहेत. देशातील कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यानुसार, काही निर्बंध शिथील केलेत. अशात आजपासून शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच, अनेक राज्यांत शाळा, कॉलेज सुरु करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे.