TOD Marathi

बंट समाजाच्या कार्यक्रमात आतापर्यंत मी अनेकवेळा आलो आहे, त्यामुळे मला देवेंद्र शेट्टी फडणवीस म्हटलं जातंय, असं विधान केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाच्या कार्यक्रमात फडणविसांनी अनेक राजकीय कोपरखळ्या देखील मारल्या.  या कार्यक्रमात बोलताना गंमतीने फडणवीस म्हणाले की, मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल, त्यामुळे मुंबईतील दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

तसेच बंट समाज सर्व आघाड्यांमध्ये पुढे आहे, हा समाज जिथे जाईल तिथे साखरेप्रमाणे मिसळतो, महाराष्ट्रात येऊन त्यांनी गोडवा वाढवला आहे. पाळ शेट्टी यांच्यासारखे व्यक्ती राजकारणात देखील यशस्वी झाले आहेत. बंट समाजाचे अतिशय कमी मतदान असतानाही गोपाळ शेट्टी मुंबईतून निवडून येतात. समाजात जे लोक मागे आहेत त्यांना हात देऊन पुढे करण्याचे काम बंट समाजाच्या वतीने होत असल्याचं मतही फडणविसांनी यावेळेस व्यक्त केलं.

दरम्यान बंट समाजाचे अतिशय कमी मतदान असतानाही गोपाळ शेट्टी मुंबईतून निवडून येतात. समाजात जे लोक मागे आहेत त्यांना हात देऊन पुढे करण्याचे काम बंट समाजाच्या वतीने होत आहे. समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा सरकार तुमच्यासोबत आहे. तुमची जेव्हा प्रगती होते तेव्हा आपल्या राज्याची आणि देशाचीही प्रगती होते, असंही फडणवीस यावेळेस बोलताना म्हणाले.