TOD Marathi

मुंबई : 

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातील सभेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेचा शेवट करताना आपण मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन थांबवलेलं नाही, असं जाहीर केलं आहे. तर, महाराष्ट्रातील जनतेला देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना एक पत्र देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंच्या सभेतील या मुद्यावरुन दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

“पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला.”

गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद यांनी मनसेविरुद्ध भूमिका मांडण्याचं काम सतत सुरु ठेवलं आहे. “सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवट पर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही!’, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी कालही मनसेवर टीका केली होती.