TOD Marathi

नागपुर:
उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण (Uddhav Thackeray speech was of disappointment) म्हणजे निराशेचं अरण्य होतं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray speech) नागपुरात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यासोबतच 2019 च्या निवडणुकांमध्येही तुम्ही मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपवू शकला नाही आणि पुढेही संपवू शकणार नाही. ‘कोई लाख बुरा चाहे क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है’ असं म्हणत शायरीच्या माध्यमातून देखील विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

निवडणुकीच्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने वक्तव्य केलं जातं की आधी राजीनामा द्या त्यानंतर निवडून या. मात्र, जेव्हा 2019 ला तुम्ही आमच्या सोबत युतीमध्ये लढलात आणि निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस (NCP and Congress) सोबत गेलात तेव्हा तुम्ही राजीनामा दिलात का? असा प्रतिप्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला.

बुधवारी मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक आहे असंही म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतील याची उत्सुकता होती, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना आपले प्रतिक्रिया दिली आहे.