TOD Marathi

भंडारा : जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नुकतीच केले यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे (Shinde) गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव (Gulabrao)पाटलांना चांगलं धारेवर धरलं. गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) आपल्या फायद्यासाठी आजा बदलला, अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी पाटलांना सुनावलं आहे.

सत्तांतर झाल्यापासूनच गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार प्रहार करत आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे केवळ इस्टेटीचे वारसदार आहेत. तर आम्ही विचारांचे वारसदार आहोत, असंही त्यांनी बऱ्याच वेळा बोलून दाखवलंय. पाटलांचे याच वक्तव्याचा आता दानवेंनी खरपूस शब्द समाचार घेतलाय.

सर्वसामान्यांची सेवा हेच हिंदुत्व आहे. गुलाबराव पाटलांची जुनी भाषणे तुम्ही एका. आजा शिवसेना के पास आजा… बाळासाहेब ठाकरे के पास आजा…, असं हेच बोलत होते. आता त्यांनीच बंडखोरी केली, अन् आजा बदलला, अशी सडकून टीका त्यांनी यावेळेस केली आहे.