TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जून 2021 – येत्या 20 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलं आहे.

शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने शिक्षण संस्थांना दिलेत. पण, कशा पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट नसल्यामुळे संभ्रम कायम आहे, असे चित्र आहे.

शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात. त्याचं नियोजन कसे असेल? याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याच मुद्यावर प्रसारमाध्यमांशी बोलल्या. राज्यातील शाळा कधी सुरू होणार? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत सांगितले की, सध्या शाळा सुरु न करता केवळ ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवायचे आहे. तसेच येत्या १५ ते २० दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

या दरम्यान, परिपत्रकानुसार सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शाळांना दिलेत. पण असे असले तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते 12 वीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळेच शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम होते. याबाबत आज वर्षा गायकवाड आपली भूमिका स्पष्ट केलीय.