TOD Marathi

मुंबई :  जर तुम्ही आमच्या मशिदींसमोर हनुमान चालिसा वाचणार असाल आणि दुप्पट आवाजात वाचणार असाल तर आम्ही काही बांगड्या घालून बसलो नाहीत, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आझमी यांनी मनसेवर चांगलीच आगपाखड केली आहे.

आझमी म्हणाले की,  प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावं, यासारखी कोणती चांगली गोष्ट असू शकत नाही. आम्ही तर म्हणतो एखाद्या मंदीरासमोर जर तुम्ही हनुमान चालिसा वाचणार असाल, त्यांना पाणी, ज्युस, सरबताची गरज असेल तर ते तर आम्ही मुस्लिम लोक स्वत: देऊ. पण जर तुम्ही आमच्या मशिदींसमोर हनुमान चालिसा वाचणार असाल आणि दुप्पट आवाजात वाचणार असाल, तर आम्ही काही बांगड्या घालून बसलो नाहीत.

तसेच राज ठाकरेंचं राजकीय करियर संपलं आहे. ते कधी झेंड्यात हिरवा रंग लावतात,तर कधी झेंडाचं बदलतात, कधी मराठी उत्तर भारतीयांचा मुद्दा उपस्थित करतात, तर कधी हिंदी उत्तर भारतीय लढाई करतात, हे फक्त राजकारणात स्वत: चे स्थान शोधण्यासाठी हे सर्व करत आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही स्विकारणार नाही. हे सर्व द्वेष पसरवण्यासाठी ते करत असल्याचंही आझमी यांनी म्हटलं आहे.