TOD Marathi

मुंबई :  गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका शिवसेना लढवणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. संजय राऊत पुढे म्हणालेत मी, काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा आमचा विचार आहे, मात्र त्यांच्या नेत्यांची इच्छा असेल तर ते शक्य होईल. वेळेनुसार निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने पुर्ण तयारी करून हा निर्णय घेतलेला आहे. निवडणुका घेणं गरजेच आहे.

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या लाटेचा कहर असताना सर्वच पक्षांनी कशाप्रकारे तिथे प्रचारसभा घेतल्या विशेष करून पंतप्रधानांनी कशाप्रकारे मोठ्या सभा घेतल्या. पंजाबमध्ये जे घडलं त्याच्यानंतर आम्हाला पंतप्रधान मोदी यांची चिंता वाटत असल्याचे राऊत म्हणाले. गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढण्याचा विचार आहे आणि त्यानुसार आमची तयारी सुरू आहे. आमचे पोस्टर, ॲडव्हर्टायझिंग दिसत नसतील पण आमचे विचार मजबूत आहेत असंही राऊत म्हणालेत.
गोव्यामध्ये युती व्हावी असा आमचा विचार आहे. काँग्रेसने आमच्यासोबत राहावं म्हणून मी स्वत: बोलणी केली आहेत. काँग्रेसला जर स्वबळावर सत्ता मिळेल, असे वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे राऊत म्हणाले. काही ठिकाणी टप्प्यांमध्ये निवडणुका आणि काही ठिकाणी एकाच टप्प्यात निवडणुका ही राजकीय पक्षांची सोय पाहिली जात आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्येसुद्धा हेच पाहिलं. काही पक्षांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून, या केलेल्या तडजोडी असाव्यात, असे राऊत यावेळी म्हणाले.