TOD Marathi

नागपुरकर… तुमच्यासाठी महत्वाची बातमी

नागपूर:

आतापर्यंत सर्वसाधारण ३३९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना तो ४७६ मिलिमीटर पडलेला आहे. १०९ टक्के पडलेल्या पावसामुळे नागपूरलाही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला. (Heavy rainfall in Nagpur) धो धो पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील २४०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ३४८ गावांना पुराचा धोका वर्तविण्यात आला असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. (Nagpur District Collector R. Vimala appealed people to be at safe place)

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परीस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचे आर. विमला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील नाल्यात स्कॉर्पिओ बुडाल्याने मंगळवारी सहा जणांना जलसमाधी मिळाली होती. (Six people drowned) मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. पावसाळ्यात होणाऱ्या अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोणत्या नद्यांना धोका..?

नागपूर शहरात नाग नदी, पिवळी नदी तर ग्रामीणमधील वेणा नदी, गोमटी नाला, वडगाव धरण, कामठीतील कन्हान नदी, हिंगण्यातील वेणा नदी, सावनेरमधील कोलार नदी, खेकरानाला, उमरी प्रकल्प, कळमेश्वरमधील मोरधाम नदी, चंद्रभागा, उमरेडमधील नांद, मोहना नदी, भिवापूरमधील नक्षी नदी, कुहीतील कन्हान, आम नदी, वैनगंगा नदी, मौद्यातील कन्हान, बोरगाव नाला, पारशिवनीतील कन्हान, पेंच नदी, काटोलमधील जाम नदी, नरखेडमधील वर्धा नदी, रामटेकमधील सूर, कपिला नदी यांच्यासह इतर नाल्यांपासून नागरिकांना धोका वर्तविण्यात आला आहे. शहरी भागातील ११० गावे तर ग्रामीण भागात ११ गावे प्रभावित होण्याची आणि त्यावर जलसंकटाची शक्यता आहे.