TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 सप्टेंबर 2021 – विद्यार्थ्यांना प्रगत आणि उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी ठाकरे सरकारकडून आदर्श शाळा बांधण्यात येणार आहे. यामार्फत आता मार्च महिन्यात निवडलेल्या सुमारे 488 शाळांसाठी राज्य सरकारकडून 494 कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार असून विद्यार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत.

आदर्श शाळा विकसित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडणार आहे. तसेच आदर्श शाळांचे बांधकाम समग्र शिक्षा अभियानाच्या यंत्रणेमार्फत केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आदर्श शाळांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक निधी ई गव्हर्नंसच्या निधीमधून उपलब्ध करून देणार आहे.

शासकीय निकषांवर पात्र ठरणाऱ्या शाळांची निवड आदर्श शाळांसाठी करणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे.

‘अशी’ होणार शाळांची निवड –

  • आकर्षक शाळा इमारत
  • विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या
  • मुलां-मुलींकरीता आणि CWSN साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे
  • पेयजल सुविधा आणि हँड वॉश स्टेशन
  • मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह तसेच भांडार कक्ष
  • शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य
  • ग्रंथालय/वाचनालय
  • संगणक कक्ष, Virtual Class Room ची सुविधा
  • विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत
  • आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील fire extinguisher उपलब्धता
  • परिसरातील शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्धता