TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 मे 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाने देशात हाहाकार माजला आहे. दररोज हजारो लोकांचे मृत्यू होत आहे, तरीही केंद्र सरकार कोरोना लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, आर्थिक मदत आदींकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आढळत आहे. म्हणून देशातील १२ प्रमुख पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही मागण्या आणि सूचना केल्यात. देशातील कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी तत्काळ काही पाऊलं उचलावीत, असे या पत्रात म्हंटलं आहे. कोरोना संकटाचा ‘अभूतपूर्व मानवी आपत्ती’ म्हणून उल्लेख करत विरोधी पक्षांनी भाजपला सुनावले आहे.

केंद्र सरकारने याअगोदर पाऊलं उचलली असती, तर ही वेळ आली नसती, असं देखील पत्रात त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पत्रावर बसपा प्रमुख मायावती, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह बारा पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

दिलेल्या पत्रात केंद्र सरकारला विरोधकांनी पुढील ८ सूचना केल्या आहेत.
– केंद्र सरकारने उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक सोर्सकडून लस खरेदी करावी. (स्थानिक किंवा जागतिक)
– तत्काळ मोफत व सर्वांसाठी लसीकरण मोहीम राबवावी.
– स्थानिक लसीकरण उत्पादन वाढवण्यासाठी कम्पलसरी लायसेन्स असावे.
– लसीकरणासाठी केंद्र सरकारने ३५ हजार कोटींचे बजेट द्यावे.
– सेंट्रल विस्टाचे बांधकाम तत्काळ थांबवावे व या पैशांचा वापर ऑक्सिजन-लशीसाठी करावा.
– पीएम केअर्स फंड व इतर ट्रस्टमध्ये असलेला पैसा लस, औषधं, मेडिकल उपकरणे खरेदी करण्यासाठी करावा.
– बेरोजगारांना महिन्याला ६ हजार रुपये द्यावेत.
– कृषी कायदे मागे घ्यावेत आणि कारण, आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये कोरोना पसरत आहे.