TOD Marathi

छत्रपती शिवाजी महाराजही यु्द्धात तह करायचे. उद्धव ठाकरे यांनीदेखील तसाच तह करण्याची तयारी दाखवली असती तर आज शिवसेना फुटली नसती असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली. शिंदे गटात जाणारा मी काही पहिला आमदार नव्हतो. शिवसेनेचे ३२ आमदार गेल्यानंतर शिंदे गटात (Eknath Shinde camp) जाणारा मी ३३ वा आमदार होतो. गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. त्यांना काय चाललंय, हे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर दुरुस्ती केली असती, तह केला असता तर ही वेळ आली नसती. असे गुलाबराव पाटील म्हणाले. (Gulabrao Patil in Jalgaon)

शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने टीका केली जात आहेत. (Uddhav Thackeray and Aaditya Thackeray) शिंदे गटातील आमदार गद्दार आहेत, हे वारंवार सांगितले जात आहे. शिंदे गटाकडूनही या टीकेचा तितक्याच जोरात प्रतिवादही केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती. मी त्यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. पण उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत ऐकले नाही आणि ही वेळ आली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तेव्हाच तह झाला असता तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे आता राज्यभरात फिरत आहेत. ते ३२ वर्षांचे तरुण आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्यात फिरावे, हेच आम्ही सांगत होतो. पण आदित्य ठाकरे आताही राज्यभरात फिरत असतील, तर परमेश्वर त्यांचं भलं करो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांनाही प्रत्युत्तर दिले. आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला. मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.