TOD Marathi

ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला एकाच वेळी डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मध्यप्रदेश सरकारने नवा डेटा तयार केला मात्र महाराष्ट्र सरकारने तो केला नाही. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण मिळू शकलं नाही. आम्ही दोन वर्षांपासून सांगतोय की डेटा गोळा करा मात्र ते न केल्यामुळे ओबीसी आरक्षणाची हत्या झाली आहे. मंत्री मोर्चे काढत राहिले, मुख्यमंत्र्यांनीही लक्ष दिले नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

आरक्षणासाठी राज्य सरकारवर आम्ही दबाव तयार करू, मैदानात उतरु. हे सरकारच मुळात ओबीसी विरोधी आहे अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.