TOD Marathi

लखनौ : राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृजभूषण बोलत होते.

बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅलीही काढल्यानं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज ठाकरेंवर टीका करताना सिंह म्हणाले की, आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचं, हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्येतील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे.

तसेच महाराष्ट्रात आता राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सिंह यांनी यावेळेस घेतली आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. हे त्यामुळे राज्यातील नेत्यांचे अयोध्या दौरे सध्या चर्चेचा विषय बनला आहे