TOD Marathi

नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. ‘4-5 खासदार हालले म्हणजे शिवसेना हालत नाही. शिवसेना आमच्याच बापाची आहे. धण्युष्यबान आमचा पंचप्राण आहे,तो शिवसेनेचाच (Shivsena) राहील.आम्ही जाऊन लाल किल्ल्याला सलाम मारत नाही रायगडाला सलाम मारतो. दिल्लीकरांना ही मुंबई तोडायची आहे म्हणून शिवसेना तोडली. मुंबई (Mumbai) तोडा हा नजराणा घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला गेले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

‘मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने उभा राहतो म्हणून माझ्यामागे तपास यंत्रणा लावल्या आहेत. हा संजय राऊत घाबरणारा नाही. यंत्रणांचा वापर करून आमच्या लहान मुलींना बोलावता त्यांचा छळ करता. ईडी (ED) मागे लागली म्हणून मी खंजीर खुपसणार नाही. मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही,’ असं आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे. ‘आमदार व्हायची लायकी होती का? तुमचं राजकीय करिअर संपलंय कारण..’, बंडखोरांवर राऊत पुन्हा बरसले ‘बाळासाहेबांचे फोटो लावून चालत नाही त्यांनी आशीर्वाद द्यावे लागतात. संपूर्ण देशातून आपल्याला पाठींबा मिळतोय ममता बॅनर्जी पासून तेलंगणा चंद्रशेखर सगळे आपल्या मागे आहे.

भले-भले गेले पण शेवटी शिवसेनाच राहणार. शिवसनेच्या स्थापनेपासून देशात 280 सेना निर्माण झाल्या. यापैकी फक्त भारतीय सेना आणि शिवसेना शिल्लक राहिली. शिवसेना महाराष्ट्राचं, मराठी माणसांचं रक्षण करत आहे. या शिवसेनेचे सरसेनापती हे बाळासाहेब ठाकरे आहेत. नाशिक मधील चित्र प्रेरणा देणारं आहे. सत्तेचं दार याच नाशिकमधून उघडले आहे. ही विचारवंतांची भूमी आहे विकल्या जाणाऱ्यांची ही भूमी होऊ शकत नाही. धनुष्यबाण हातात ठेवा कुठे घुसवायचा हे योग्य वेळ आल्यावर आदेश येईल,’असे राऊत यांनी यावेळी सांगितले.