TOD Marathi

आपत्ती व्यवस्थापकाच्या बैठकीमध्ये (Disaster Management Meeting) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा जो विषय होता त्याप्रमाणे ३० लाख शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या मध्ये ३ हजार ६०० कोटीचे वाटप सुरु झालेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. सततच्या पावसामुळे निकषामध्ये जे बसतं नव्हतं त्याचा देखील पंचनामा करुन जे ६ लाख शेतकरी आहेत त्यांना देखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले. यासोबतच विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. देवीचे दर्शन घ्यायला कोणालाही बंदी नाही अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray visited Tembhi Naka) आज ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घ्यायला गेल्या देखील होत्या. मोठ्या प्रमाणात यावेळी शिवसैनिक सोबतच महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.

पुढे बोलताना जे कोणी देशद्रोही लोकांना मदत करणार त्यांना माफ केले जाणार नाही, देश विरोधी कृत्य करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल आणि पाकिस्तान जिंदाबादचे जो नारे देईल त्याला माफ केले जाणार नाही, असेही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी बोलताना राज्यात होणार असलेल्या पोलीस भरती वर देखील त्यांनी भाष्य केले. 20000 पोलिसांची भरती होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे आणि ती दसरा मेळाव्यात तुम्हाला दिसेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.