TOD Marathi

टिओडी मराठी, काबुल, दि. 15 ऑगस्ट 2021 – तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये एक-एक शहरांवर ताबा मिळवला आहे. आता तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये घुसले आहेत. तसेच त्यांनी देशातील सर्वच सीमा ताब्यात घेतल्यात. याबाबतची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिलीय. दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश केलाय. तसेच लोकांत दहशत पसरवण्यास सुरुवात केलीय.

तालिबानने सत्ता परिवर्तन करण्याची मागणी केलीय. त्यावर अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी शिक्कामोर्तब केलंय. “काबुलवर हल्ला होणार नाही, सत्ता परिवर्तंन शांततापूर्वक मार्गाने होईल, असे गृहमंत्री मिर्जकवाल यांनी एका न्यूजला सांगितलं आहेत.

तर, दुसरीकडे तालिबानने जबरदस्तीने काबुलवर ताबा मिळवणार नाही, असे सांगितलं आहे. सर्वांना सत्ता परिवर्तन हवंय. सत्ता परिवर्तन शांततेत झालं तर कोणतंही नुकसान होणार नाही, असे तालिबानकडून सांगण्यात येत आहे.

याअगोदर शनिवारी तालिबानने जलालाबादवर ताबा मिळवला होता. यानंतर काबुल शहर शिल्लक होतं. काबुल हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानलं जातं होतं. मात्र, आता या शहरावरही तालिबानने ताबा मिळवायला सुरुवात केली आहे.

जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबुलला देशाच्या पूर्व भागापासून वेगळं केलं होतं. यावेळी जलालाबादच्या राज्यपालांना कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केलं होतं. सामान्य नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी असे केलंय.

अफगाणिस्तानला लागून असलेल्या तोरखम सीमेवर पाकिस्तानने कडेकोट सुरक्षा ठेवलीय. अपगाणिस्तानातील स्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे, असे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद अहमद यांनी सांगितलं आहे.

अफगाण पोलिसांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केलंय. त्यामुळे सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शेख राशिद अहमद यांनी सांगितलं आहे.