TOD Marathi

बिहारच्या राजकारणात आजचा दिवस ‘वादळी दिवस’ अतिशय ठरला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडली आहे. त्यानंतर नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (Nitish Kumar resigned as CM of Bihar) भाजपा आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासोबत युती केली आहे. त्याचबरोबर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून वेळसुद्धा घेतला आहे. या सर्व घडामोडी बिहारच्या राजकारणात केवळ एकाच दिवशी घडल्या आहेत.

भाजपा-जेडीयूचं सरकार कोसळल्यानंतर, बुधवारी दुपारी दोन वाजता नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. (Tejaswi Yadav) बिहारच्या राजभवनात उद्या हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर (RJD Twitter Account) अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी भाजपा आणि जेडीयू पक्षाने युती केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपामध्ये सुरु असलेला वाद शिगेला पोहचला होता. अखेर नितीश कुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवून आणला आहे.