TOD Marathi

Sunil Dutt Birth Anniversary : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी उत्तम कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली. 6 जून 1929 रोजी पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यातील खर्डी नावाच्या गावात सुनील दत्त यांचा जन्म झाला होता. फक्त अभिनयच नाही, तर सुनील दत्त एकेकाळी राज्यसभेचे (Bollywood Rajyasabha MP) खासदारही होते. अभिनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास हा खासदारकी आणि मंत्रीपदापर्यंत गेला. मनमोहन सिंह सरकारमध्ये ते युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Sunil Dutt Birth Anniversary) जाणून घेतलेले त्यांच्याबद्दलचे हे काही खास क्षण.

सुनील दत्त यांचे खरे नाव हे बलराज दत्त होते. सुनील दत्त यांचे लहानपण अतिशय संघर्षमय होते. वयाच्या पाचव्या वर्षीं त्यांचे वडील दिवाण रघुनाथ दत्त यांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर आई कुलवंती देवी यांनीच सुनील दत्त यांना लहानाचे मोठे केले. यानंतर सुनील दत्त पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, त्यांनी मुंबई बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरी स्वीकारली.

एकेकाळी  रेडिओ निवेदक म्हणूनही केले काम!

सुनील दत्त यांना त्यांच्या भरदार ,घनगंभीर आवाज, देखणे व्यक्तिमत्व यामुळे त्यावेळच्या रेडिओ सिलोनच्या हिंदी विभागात निवेदक म्हणून संधी मिळाली. तिथेच रेडिओसाठी मुलाखती घेत असताना एकदा त्यांना नर्गिसची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. सुनील दत्त यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व व भारदार आवाज हेरुन गप्पात बोलता बोलता नर्गिसने त्यांना “तू सिनेमात का नाही काम करत” असे विचारले. आणि पुढे सुनील दत्त यांनी 1955 मध्ये ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ (railway platform)  या आगामी चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

‘अशी’ सुरु झाली  नर्गिस आणि सुनील दत्त यांची  प्रेमकहाणी

मदर इंडिया (Mother India) स्व.महबूब यांच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी नर्गिसला आगीतून वाचवताना सुनिल दत्त यांनी नर्गिस दत्त यांना लग्नाची मागणी घातली होती. पुढे यांची प्रेमकहाणी ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. (Mumbai
Mother India) ‘मदर इंडिया’च्या सेटवर आग लागल्याने नर्गिसला वाचवताना सुनील दत्त गंभीर जखमी झाले होते. आणि तिथून खऱ्या अर्थाने दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली.

मुलगा संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेल्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटात सुनील दत्त हे शेवटचे दिसले होते. सुनील दत्तला (Sunil Dutt) यांना जनतेने एकदा दोनदा नाही तर लागोपाठ तीन वेळा लोकसभेवर पाठवून लोककल्याणासाठी प्रेरीत केले. क्रीडामंत्री असतानाच 2005मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्याचे अचानक झालेले निधन अनेकांना चटका लावून गेले.