TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 6 जुलै 2021 – पौष्टिक घटक मिळविण्यासाठी पालेभाज्या खा, असा सल्ला दिला जातो. मात्र, पालेभाज्या खाताना काही कच्चा तर काही शिजवून खाव्यात, हेही माहित असणं आवश्यक आहे.

विशेषतः ज्यांच्या आतड्यांना व्रण पडले असतील त्यांनी पालेभाज्यांमधील रेषांचा भाग खाणं टाळावे. अशांनी तो भाग काढून पालेभाजीचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

ज्यांना पातळ जुलाब, मुरडा किंवा संग्रहणीचा त्रास होत असेल. तसेच ज्यांचे पोट नाजूक आहे, त्यांनी पालेभाज्यांचा समावेश अधिक करू नये. ज्यांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी पालक खाणे टाळावे, कारण त्यात ऑक्‍झिलेट्‌चे प्रमाण जास्त असते.

क्‍लोरोफिल : पालेभाजीमध्ये क्‍लोरोफिल नावाचा प्रभावी जंतुनाशक घटक असतो. हा घटक दातांत अडकलेल्या अन्नकणांचं निर्मूलन करतो. तसेच दातांत कीड निर्माण होऊ देत नाही.

क्‍लोरोफिल नुसत्या दातातील नव्हे तर शरीरातील, आतड्यातील निरुपयोगी जंतूंचाही नाश करतो. क्‍लोरोफिलमध्ये उच्च प्रतीचे अधिक प्रोटीन असते. जे लोक रसाहार घेतात अशांना अधिक प्रोटीनची गरज असते. ते प्रोटीन त्यांना पालेभाज्यांच्या रसामधून मिळते.

लोह : ताज्या पालेभाजीमध्ये लोहही अधिक असते. आपल्या आरोग्याला लोहाची आवश्यकता अधिक असते, ती गरज पालेभाज्यांतून भागवली जाते.

क्षार : पालेभाज्यांमध्ये जास्त क्षार असतात. ते पोटातील आम्लता कमी करतात. आपल्या शरीरातील रक्‍ताला क्षाराची जास्त गरज असते. म्हणून पालेभाज्यांचा रस आपल्या आहारातून घेणं महत्त्वाचं आहे.

(टीप : हि माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. याबाबत आवश्य डॉक्टर, तज्ञांचा सल्ला घ्यावा.)