TOD Marathi

शिर्डीः
छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना टकमक टोकावरून फेकून द्यावं, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं. तर खासदार संजय राऊत यांनीदेखील त्यांच्याच सुरात सूर मिसळला आहे. 350 वर्षांपासून टकमक टोकाचा वापर झालेला नाही. या निमित्ताने तो व्हावा, असं वक्तव्य राऊत यांनी केलं. संजय राऊत (Sanjay Raut) शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करूनही त्यांना पाठिशी घातलं जातं आहे. मात्र, महाराष्ट्र या अपमानानंतर शांत बसणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.
राज्यपाल इथे असते तर त्यांना याच टकमक टोकावरून फेकून दिलं असतं, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) एवढा अपमान होऊनही भाजप साधी माफी मागायला तयार नाही. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती (BJP spokesperson Nupur Sharma would have commented on Prophet Mohammad). त्यांच्यावर भाजपने कारवाई केली. गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र छत्रपती शिवरायांचा घोर अपमान होऊनही काहीही कारवाई नाही. राज्यपाल आणि त्रिवेदी यांनाही जाब विचारला नाही.
उदयनराजे (Udayanraje) यांनी केलेली मागणी म्हणजे महाराष्ट्राची भावना आहे. 350 वर्षापासून टकमक टोकाचा वापर झाला नाही आहे. या निमित्ताने तो व्हावा, असंही संजय राऊत म्हणाले.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावर बोलताना संजय राऊतांनी भाजपावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. कर्नाटकच्या सरकारने वातावरण बिघडवण्यासाठी योजनाबद्ध आराखडा तयार केलाय. बेळगाव प्रश्नावरून लक्ष दूर करण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत म्हणाले.